शासकीय योजना

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान – थोडक्यात माहिती

घोषणा व कालावधी :
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात होणार आहे.

उद्दिष्टे :

  • ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करणे.

  • पारदर्शक व जबाबदार प्रशासन निर्माण करणे.

  • लोकसहभागातून शाश्वत विकास साधणे.

  • संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या आदर्शानुसार स्वच्छ, निरोगी व प्रगत गाव घडविणे.

मुख्य घटक (७ मुद्दे) :

  1. सुशासनयुक्त पंचायत – लोकाभिमुख व जबाबदार शासनव्यवस्था.

  2. सक्षम पंचायत – स्वतःच्या उत्पन्नातून, CSR व लोकवर्गणीतून आर्थिक सक्षमता.

  3. जलसमृद्ध, स्वच्छ व हिरवेगार गाव – पाण्याचा ताळेबंद, स्वच्छ पिण्याचे पाणी, हरित उपक्रम.

  4. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण – रोजगार निर्मिती व स्थावर मालमत्ता उभारणी.

  5. गावपातळीवरील संस्थांचे सशक्तीकरण – ग्रामसभा, महिला सभा, समित्या यांचे नियमित आयोजन.

  6. उपजीविका विकास व सामाजिक न्याय – महिला, मागासवर्गीय, दिव्यांग व दुर्बल घटकांसाठी योजना.

  7. लोकसहभागातून ग्रामचळवळ – स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धनासाठी लोकांचा थेट सहभाग.

पुरस्कार योजना :

  • तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर उत्कृष्ट ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना पुरस्कार.

  • एकूण निधी – ₹290.33 कोटी.

  • निवड प्रक्रियेसाठी पारदर्शक मूल्यांकन पद्धती (गुणांकन) लागू केली जाईल.

अभियानाची कार्यपद्धती :

  • ग्रामसभांद्वारे नियोजन आणि समित्यांची स्थापना.

  • प्रत्येक गावात डिजिटल साधनांचा वापर – “मेरी पंचायत” ॲप, पंचायत निर्णय ॲप, ग्रामसंवाद ॲप.

  • कर वसुली, लोकवर्गणी, स्वच्छता व जलव्यवस्थापन यांवर विशेष भर.

  • प्रशिक्षण, कार्यशाळा व जनजागृती मोहीमा.

  • ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची अंमलबजावणी.

अपेक्षित परिणाम :
या अभियानातून गावांचे शाश्वत विकास आराखडे तयार होतील, पारदर्शक व जबाबदार ग्रामपंचायत घडेल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित होईल, तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भाग अधिक समृद्ध व प्रगत होईल.

Share and Enjoy !

Shares